कर्जाला कंटाळून शेतकरी भानुदास देउळकर यांनी केली आत्महत्या.
कर्जाला कंटाळून शेतकरी भानुदास देउळकर यांनी केली आत्महत्या.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा (धामक) येथिल भानुदास देउळकर यांनी आज दुपारी घरी कोणीही नसताना गळफास घेवुन आत्महत्या केली आहेत ,
त्यांनी मुलीच्या लग्नाला भारतीय स्टेट बँक धामक मधुन 70000 हजार कर्ज घेतले होते सतत नापिकीमुळे कर्ज भरण्यात वेळ लागत असल्याने कर्ज रीनीलवल करुन घेतले आता कर्जाची रक्कम 100000 जवळपास गेली आहेत.त्यामुळे कर्जाची रक्कम भरण्यासाठी पैसै कुठुन आनणार असा प्रश्न पडला असेल त्यामुळे नैराश्य आल्यामुळे आज दुपारी 2 वा सुमारात लहान मुलांच्या पाळण्याची ढोरीला गळफास घेवुन आत्महत्या केली आहेत.त्याच्या मागे पत्नी मुले सुना नातवंडे असा आप्त परीवार आहेत पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस स्टेशन चे ठाणेदार धोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ विजय बगेळ, पो का प्रफुल्ल वानखडे, पी सी अंकुश पाटील करत आहेत.
Comments