पावसाचा खंड पडलेल्या मंडलातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या.

कृषी विभागाने केलेला चुकीचा सर्व्हे रद्द करा.

अन्नत्याग करणार असल्याचा शेतकरी नेते छोटू मुंदे यांचा इशारा.

उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चार महसुली मंडळामध्ये सन 2023 मधील हंगामातील पावसाच्या संदर्भात नुकसानग्रस्त महसूल मंडळाचे सर्वेक्षण करून तात्काळ मदत देण्याचे विमा कंपनीला आदेश देण्यात यावे अशी मागणी विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी जिल्हाधिकारी अमरावती,उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे, तहसीलदार नांदगाव खंडेश्वर तसेच तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये मागील ऑगस्ट 2023 मध्ये सलंग 25 ते 27 दिवस पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनचे पीक करपून गेले आहे तरी काही ठिकाणी विषाणूजन्य रोगाने पीक ग्रस्त झाले आहे अशा


परिस्थितीत विमाधारक शेतकरी हे अग्रीम 25% विमा रक्कम देण्यास पात्र आहे परंतु नांदगाव खंडेश्वर येथील तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांनी पावसाचा खंड फक्त वीस दिवसाचा असल्याचे त्यांच्या विभागाने केलेल्या सर्व्हेत नमूद केले असल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी हे नुकसान भरपाई पासून वंचित


राहिलेले आहे त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांनी सादर केलेला सर्व्हे रद्द करून तो सर्व्हे पुन्हा करून तालुक्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिकविमा देण्यात यावा तसेच नांदगाव खंडेश्वर,धामणगाव रेल्वे आणि चांदुर रेल्वे या तिन्ही तालुक्यामधील काही मंडळात शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे असल्याने याच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी त्वरित देऊन याची चौकशी करून लवकरात लवकर


शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा देण्याची मागणी सुद्धा विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी केली आहे.आणि तसे आदेश न दिल्यास नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी नेते छोटू मुंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात