फुबगावं येथील शेतकऱ्याने केली यशस्वी पपईची शेती.

 आठ महिन्यात काढले लाखोचे उत्पादन.

पिकाला दिवसा लाईट देण्याची मागणी.

उत्तम ब्राम्हणवाडे.

 शेतकरी व शेती ही नेहमीची समस्या सर्वांच्या परिचयाची आहे भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे आपण म्हणतो परंतु सध्या शेतकरी हा समस्याच्या विळख्यात अटकला असून कधी जास्त पाऊस आला तर पीक हातच जाते किंवा कमी पाऊस आला तर उत्पादनात घट होते.
तर कधी कपाशी पिकावर लाल्या पडल्याचे दृश्य आहे या मधून कदाचित वाचलं तर वन्यप्राणी यांनी केलेले नुकसान वेगळे ही नित्याची बाब आहे. दुसरं पीक जस गहू. चणा पेरणी करायच म्हटल तर त्याला पाणी द्यावं लागते रात्रीचि लाईट असल्याने अर्ध्या रात्री अंधारात


पिकाला पाणी देण्या करिता जावे लागते अश्या अनेक समष्यानी शेतकरी ग्रासला असून जीव मुठीत घेऊन काम करावे लागते अस्या परीस्तिथीत तालुक्यातील फुबगावं येथील शेतकरी भेंया धवस यांनी आठ महिन्यापूर्वी पपईची लागवड केली आणि आजरोजी


बहारदार पीक आले असून विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले आहे आज त्यांची पपई दिल्लीच्या बाजारात विक्रीला गेली असून पारंपरिक पिकाबरोबरच फळबागेला प्राधान्य देत मेहनतीच्या जोरावर त्यांनी लाखावर उत्पादन घेतले असून त्यांचं कौतुक होत आहे.


जर शासनाने शेतकऱ्यांना दिवसा मोटरपम्प करिता लाईट दिली तर याही पेक्षा जास्त उत्पादन शेतकरी घेईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली रात्रभर जागून शेतात अंधारात ओलीत करावे लागते कधी वण्याप्रण्याच्या हल्यात. तर रात्री शेतावर ओलिता करता जाताना भरधाव वाहणाने मागून येऊन उडवल्याच्या अपघातात शेतकऱ्याने जीव गमावल्याच्या अनेक घटना घडल्या आहे अश्या घटना घडू नये या करता शासनाने शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यावी म्हनजे याहीपेक्ष जास्त उत्पादन तो काढेल असा विश्वास शेतकरी भेंया धवस यांनी व्यक्त केला असून दिवसा लाईट व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 शासनाने शेतकऱ्यांना जर दिवसा मोटरपम्पा करिता विद्युत लाईन दिली तर आपण या पेक्षाही जास्त उत्पादन घेऊ शकतो. शेतकरी हा रात्रभर जागून शेतात ओलीत करतो जर विद्युत विभागाने दिवसा लाईट दिली दिली तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होईल. याकडे शासनाने लक्ष द्यावे. 

भैय्या धवस.
(शेतकरी)
फुबगाव,ता.नांदगाव खंडेश्वर.


Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात